बीएसएनएलईयू महात्मा गांधींना आदरांजली अर्पण करते आणि त्यांच्या धार्मिक सहिष्णुतेच्या वारशाला पुढे चालवण्याचा संकल्प करते.
आज संपूर्ण राष्ट्र महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करत आहे. 1948 मध्ये आजच्याच दिवशी, महात्मा गांधींना नथूराम गोडसेच्या तीन गोळ्या लागून त्यांची हत्या झाली. महात्मा गांधी हे कट्टर राम भक्त होते. नथूराम गोडसेच्या गोळ्यांनी जमीनवर पडताना देखील महात्मा गांधी "हे राम" असे म्हणत होते. महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करतांना आपल्याला हे विसरता येणार नाही की त्यांना का मारले गेले. महात्मा गांधींना त्यासाठी मारले गेले कारण ते हिंदू-मुस्लीम एकतेसाठी उभे होते. महात्मा गांधींनी धार्मिक सहिष्णुतेचा पुरस्कार केला. त्यांचा विश्वास होता की, सर्व धर्माच्या लोकांनी या देशात शांततेत राहावे. ह्याच कारणामुळे त्यांची हत्या धार्मिक पंथप्रेमी नथूराम गोडसेने केली. बीएसएनएलईयू महात्मा गांधींनी प्रचारित केलेली धार्मिक सहिष्णुता मानते. बीएसएनएलईयू महात्मा गांधींना आदरांजली अर्पण करते आणि त्यांच्या धार्मिक सहिष्णुतेच्या वारशाला पुढे चालवण्याचा संकल्प करते.
-P.अभिमन्यू, महासचिव.